T-20 series : न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताच्या खिशात

Share

नॅपियर (वृत्तसंस्था) : भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील (T-20 series) मंगळवारी खेळली गेलेली शेवटची लढत पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ लुईस मेथडनुसार अनिर्णित राहिली. ही लढत बरोबरीत सुटल्याने दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेणाऱ्या भारताने १-० ने मालिका खिशात घातली.

न्यूझीलंडने दिलेल्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ९ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात ७५ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवसह भारताचे आघाडीचे चार फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. संकटात सापडलेल्या भारतासाठी कर्णधार हार्दिक पंड्या धावून आला. त्याने फलंदाजीची सूत्रे हाती घेत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंड्या ३० धावांवर खेळत होता.

मात्र पावसाने बॅटींग सुरू केल्यानंतर हा सामना थांबवण्यात आला. पावसाने व्यत्यय आणल्याने अखेर डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निर्णय लावण्यात आला. त्यानुसार हा सामना अनिर्णित राहिला. तीन सामन्यांतील दोन सामन्यांचा खेळ पावसाने खराब केल्याने एक लढत जिंकणाऱ्या भारताने मालिका विजयाचा चषक उंचावला.

तत्पूर्वी न्यूझीलंडने २० षटकांत १६० धावा जमवल्या होत्या. त्यात यष्टीरक्षक, सलामीवीर देवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. भारताच्या मोहम्मद सिराजने सर्वांनाच अचंबित केले. त्याने चार षटके फेकत केवळ १७ धावा देत ४ बळी मिळवले. अर्शदिप सिंगनेही प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ३७ धावा देत ४ बळी मिळवले.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या तुफानी फलंदाजीने भारताला मोठा विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.

इतिहासातील तिसराच डीएलएसनुसार अनिर्णित सुटलेला सामना

विशेष म्हणजे डीएलएस मेथडने शक्यतो सामना अनिर्णित सुटत नाही. पण मंगळवारचा सामना बरोबरीत सुटला असून विशेष म्हणजे इतिहासातील हा तिसराच असा डीएलएसनुसार अनिर्णित सुटलेला सामना आहे. याआधी २०२१ मध्ये नेदरलँड विरुद्ध मलेशिया आणि माल्ता विरुद्ध गिब्रल्टार असे दोन सामने डीएलएस मेथड वापरुनही अनिर्णीत सुटले होते.

Recent Posts

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

8 mins ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

6 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

9 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

9 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

10 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

11 hours ago