स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी सरकारमधून सोडचिठ्ठी

Share

कोल्हापूर : गेली दोन वर्षे राज्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी अधिकृत घोषणा केली.

शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई, दिवसा वीज, कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान अशा विविध मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या. या सर्व मागण्याबाबत फारशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतला नसल्यानेच आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.

शेट्टी यांच्या या घोषणेने महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. अडीच वर्षात प्रथमच आघाडीतून एक पक्ष बाहेर पडला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली होती.

Recent Posts

‘या’ तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल…

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…

12 mins ago

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…

1 hour ago

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

2 hours ago

सरकारने हटवली कांदावरील निर्यात बंदी, बळीराजा सुखावला…

Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…

3 hours ago

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

4 hours ago