नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिस्टर ३६० म्हणजेच सूर्यकुमार यादवबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापेक्षा २०२३च्या विश्वचषकाशी सूर्यकुमार यादवचा अधिक संबंध आहे. खराब कामगिरीनंतरही सूर्यकुमारने एकदिवसीय संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. सूर्यकुमारने त्याची खेळी अशीच पुढे सुरू ठेवत टीम इंडियाला विजय मिळवून द्यावेत. त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. सूर्याने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष द्यावे, असा सल्ला बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वाहिनीला दिला.
हा अधिकारी म्हणाला की, सूर्यकुमार हा एक अतिशय सक्षम आणि चाणाक्ष फलंदाज आहे. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, तो ३२ वर्षांचा आहे आणि आपल्याला भविष्यासाठी संघाची योजना आखायची आहे. तिथेच यशस्वी किंवा ऋतुराजसारखे कोणीतरी असे खेळाडू येतात आणि त्याला मागे टाकतात. तो चेंडूचा क्लीन स्ट्रायकर आहे आणि धावांचा वेग सेट करू शकतो. जर तो आपली क्षमता सिद्ध करू शकला, तर ते भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले असेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…
मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…