जकार्ता (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला सोमवारी भूकंपाचे (earthquake) हादरे बसले आहे. तब्बल ५.६ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. या दुर्घटनेत ४६ नागरिकांचा मृत्यू आणि ७०० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किमी पश्चिम दिशेला असलेले सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होते. ५.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किमी होता. यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला असून ७०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सियांजूरचे अधिकारी हर्मन सुहर्मन यांनी दिली.
या भूकंपामध्ये सियांजूरमधील काही इमारती कोसळल्या आहेत. तर अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचेही नुकसान झाल्याचे समजते. तसेच इमारती कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे.
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? मुंबई : अलीकडे झालेले विस्तारा एअरलाइनवरील संकट निवळले नसून इतक्यात…
तब्बल १८८ इमारतींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : पावसाळा तोंडावर येताच मान्सूनपूर्व कामांना…
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…
मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…
DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…
महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…