नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना गंभीर इशारा दिला आहे. देशात सध्या फक्त ५ ते १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला. केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिले आहे. दुसऱ्या लाटेत २० ते २३ टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती. या तुलनेत सध्या फक्त ५ ते १० टक्के अॅक्टिव्ह रुग्णांनाच हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. अशी स्थिती असली तरी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता काहीही ठोस सांगता येऊ शकत नाही. येत्या काळात परिस्थिती बदलून भयंकर होऊ शकते. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढूही शकते, असे केंद्र सरकार म्हणाले. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले रुग्ण, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर रोज बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना केंद्राने केली आहे. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने राज्यांना या सूचना दिल्या आहेत.
कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…
विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…
विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…