Categories: मनोरंजन

शुभांगी सदावर्तेचे ‘महाराष्ट्र शाहीर’मधून पदार्पण

Share

शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात ‘संगीत देवबाभळी’मधील ‘आवली’, शुभांगी सदावर्ते ही गुणी अभिनेत्री शाहीर साबळे यांची आई लक्ष्मीबाई गणपतराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे.

पुढील वर्षी २८ एप्रिल २०२३ मध्ये चित्रपट प्रदर्शित होत असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या वाई, भोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. आता शुभांगी या चित्रीकरणात सहभागी झाली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’शी अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’बद्दल आणखी एक नवीन आणि अभिमानास्पद गोष्ट घडली ती म्हणजे या चित्रपटातील छोट्या शाहीर साबळेना आवाज देण्यासाठी निर्माते, संगीतकारांनी चक्क समाज माध्यमांवर ‘चंद्रा’ गाण्याने लोकप्रिय झालेल्या जयेश खरेला करारबद्ध केले आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे, तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात शाहिरांच्या इतर समकालीन आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पुढे येतील.

शुभांगी सदावर्तेच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, ‘माझे आजोबा म्हणजे शाहीर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचे जसे योगदान होते तसेच त्यांची आई लक्ष्मीबाई यांचाही मोलाचा वाटा होता. त्यांच्या उत्तम संस्कारात शाहीर वाढले आणि त्यांना कलेची आवड निर्माण झाली. शुभांगी ही गुणी अभिनेत्री या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या सहज वावरातून ही व्यक्तिरेखा विशेष उठून दिसणार आहे’.

नाना ‘लाल बत्ती’ सीरिजमधून करणार कमबॅक

आपल्या जिवंत अभिनयाने सर्वांनाच खिळवून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर होते. पण आता नाना पाटेकर हे प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत.

झा यांच्या आगामी ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारी ही वेबसीरिज असून या वेबसीरिजच्या माध्यमातून राजकारणातील काही काळी कृत्ये उघडकीस येणार आहेत. ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजमध्ये नाना काळा कोट चढवून वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या वेबसीरिजमध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका मेघना मलिक साकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘मिर्झापूर’, ‘अरण्यक’ आणि ‘बंदिश डाकू’ या वेबसीरिजच्या माध्यमातून आणि अनेक सिनेमांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

तसेच या वेबसीरिजद्वारे ते ओटीटी विश्वात पुनरागमन करणार आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनी ‘राजनीती’ या सिनेमात एकत्र काम केले होते. ‘लाल बत्ती’ वेबसीरिजमध्ये नानांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

नाना पाटेकरांनी अनेक हिंदी-मराठी सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या काही डायलॉगवर आजही चाहते मिमिक्री करतात. नाना केवळ अभिनेतेच नाहीत तर लेखक आणि निर्मातेही आहेत. आपल्या खास संवाद शैलीमुळे ते विशेष ओळखले जातात. मनोरंजनसृष्टीत काम करण्यासोबत नानांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे.

अप्पा हरवलेत; अरुंधती परततेय…

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका पुन्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवते आहे. या मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एकीकडे अरुंधती मालिकेतून गायब आहे, तर दुसरीकडे आप्पाही घरातून अचानक निघून गेल्याने सगळेच चिंतेत आहेत. खायची पानं आणण्यासाठी गेलेले आप्पा घरी न परतल्याने सर्वजण त्यांना शोधत आहेत. त्यातच एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने तो आप्पांचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यातच आता प्रेक्षक अरुंधतीची आतुरतेने वाट पाहत आहेत व अरुंधती लवकरच मालिकेत परतणार आहे.

गेला बराच काळ अरुंधती मालिकेतून गायब आहे. ती महाराष्ट्रभर गाण्याचा दौरा करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र घरी इतके काही घडल्यानंतरही अरुंधती परत कशी आली नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र आता अरुंधती परतणार आहे. त्यामुळे मालिकेत यापुढे काय काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अरुंधती मालिकेत जरी दौऱ्यावर जाताना दाखवण्यात आली असली तरी अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. मधुराणीची छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने तिने आरामासाठी निर्मात्यांकडून सुट्ट्या मागून घेतल्या होत्या. मात्र आता ती मालिकेत पुन्हा दिसणार आहे. त्यामुळे नेटकरीही खूश झाले आहेत.

-दीपक परब

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

18 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

37 mins ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

1 hour ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

4 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

5 hours ago