मंडणगड (प्रतिनिधी) : मे महिन्याच्या उत्तरार्धाचे सुरुवातीला सलग तीन दिवसाचे सुट्टीमुळे बँकिंग व्यवहार ठप्प राहिल्याने शहरात तीन पेट्रोल पंप व एक सीएनजी पंप अस्तित्वात असतानाही इंधन तुटवड्याची समस्या जाणवून आली. यामुळे तालुकावासीय नागरिक त्रस्त झालेच मात्र बौद्ध पौर्णिमा विकेंड व लग्न कार्यक्रमाकरिता तालुक्यात आलेले बाहेरील
नागरिक इंधन नसणे व एटीएममध्ये संपलेली कॅश यामुळे त्रस्त झालेले दिसून आले.
मंगळवारी बँका सुरु झाल्या तरी इंधन तुटवड्याची समस्या मात्र पूर्वपदावर आलेली नव्हती. या कालावधीत शासकीय कोट्यातील इंधन साठाही संपलेला असल्याची माहिती पुढे आल्याने महसूल प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे झाले आहे. शहरातील सर्व पंपांवर एकाचवेळी इंधन नसण्याची समस्या निर्माण होणे, आळीपाळीने कुठल्या ना कुठल्या पंपावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस संपलेला असणे या समस्या तालुकावासायींच्या अंगवळणी पडलेल्या आहेत.
तेल कंपन्याचे सध्याचे नियम व खासगी अस्थापनांवर महसूल विभागाचा कमी झालेला अंकुश यामुळे इंधन नसण्याच्या समस्या तालुक्याच्या नैमित्तीक व्यवहारांवर प्रभाव टाकणारी बनलेली आहे. या संदर्भात कोणासही अस्थापनांना प्रश्न विचारण्याचा अधिकार राहिलेला नसल्याने निरअंकुश अस्थापना व समस्याग्रस्त नागरिकांचा संघर्ष तालुक्यास नवीन राहिलेला नाही. इंधन पुरवठा करणारे सर्व पंप शहरापासून दीड ते अडीच किलोमीटर इतक्या लांबीवर असल्याने इंधन संपलेल्या वाहनांना रखडत पंप गाठावा लागतो.
पंपात इंधनच उपलब्ध नसल्याचे फलक पाहण्यास मिळणे ही बाब तालुकावासीयांच्या आता अंगवळणी पडली आहे. पंपासमोर पेट्रोल, डिझेल व गॅस भरण्यासाठी कृत्रिम कारणांनी लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील पंपावर किती इंधन साठा आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असल्यास किती इंधनसाठा बफर स्टॉक म्हणून ठेवावे, याची वरच्यावर तपासणी तहसील कार्यालय करीत नाही का? असा प्रश्न तालुकावासीयासमोर या समस्येच्या निमित्ताने निर्माण झाला आहे.
या समस्येसंदर्भात तालुक्यात जनक्षोभ निर्माण होऊन आंदोलन होण्याची वाट तहसील कार्यालय पाहत आहे का? असा प्रश्नही निर्माण झालेला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…