Sunday, March 15, 2026

निवडणूक आयोगाने केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

निवडणूक आयोगाने केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

कोणत्या राज्यात कधी निवडणूक ?

  1. आसाम - ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान
  2. केरळ - ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान
  3. पुदुच्चेरी - ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान
  4. तामिळनाडू - २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान
  5. पश्चिम बंगाल - २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान
  6. सर्व ठिकाणची मतमोजणी - ४ मे २०२६

बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक

मतदान - २३ एप्रिल २०२६

मतमोजणी - ४ मे २०२६

बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक, असा आहे कार्यक्रम

अधिसूचना - ३० मार्च २०२६

उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस - ६ एप्रिल २०२६

अर्ज छाननी - ७ एप्रिल २०२६

माघारीचा शेवटचा दिवस - ९ एप्रिल २०२६

मतदान - २३ एप्रिल २०२६

मतमोजणी - ४ मे २०२६

कोणत्या राज्याच्या विधानसभेची मुदत कधी संपणार ?

आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे रोजी, केरळचा २३ मे रोजी, तामिळनाडूचा १० मे रोजी, पश्चिम बंगालचा ७ मे रोजी आणि पुद्दुचेरीचा १५ जून रोजी संपत आहे.

महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू (Death) झाला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले आहेत.

आधीच्या विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यांमध्ये काय झाले होते ?

  1. आसाम - १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. रालोआने ७५ जागा जिंकल्या आणि भाजपच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली.
  2. पश्चिम बंगाल - २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान झाले. तृणमूल काँग्रेसने २१५ आणि भाजपने ७७ जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या.
  3. तामिळनाडू - २३४ विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. द्रमुकने १३३, अण्णाद्रमुकने ६६ आणि भाजपने ५ जागा जिंकल्या. द्रमुकचे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री झाले.
  4. केरळ - १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एलडीएफने ९९ आणि यूडीएफने ४१ जागा जिंकल्या. सीपीआयचे पिनारायी विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
  5. पुद्दुचेरी - ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एनडीएने १६, तर यूपीएने ९ जागा जिंकल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसचे एन. रंगास्वामी मुख्यमंत्री झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा