Friday, November 28, 2025

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम पद्धतीने बांधला जात आहे.

नियोजनानुसार हा आठ पदरी महामार्ग आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुखकर आणि अखंडित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पर्यटनाला भरपूर चालना मिळणार आहे.

एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर झाडे लावून पर्यावरणाचे संतुलन राखले जाणार आहे. काम पूर्ण होताच हा मार्ग उत्तर प्रदेश आणि राजस्थानशी जोडला जाणार असून, या दोन्ही राज्यांना दिल्ली आणि मुंबई या दोन्ही प्रमुख शहरांशी थेट जोडणी मिळणार आहे.

प्रकल्पातील वडोदरा–मुंबईला जोडणाऱ्या ३७९ किमीच्या महत्त्वाच्या भागाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, पुढील वर्षाअखेर ते पूर्ण होणार आहे. १३५९ किमी लांबीच्या या द्रुतगती मार्गामधील वडोदरा–मुंबई जोडणी, जी विरारमार्गे पूर्ण मार्गाशी जोडते, हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात निर्णायक टप्प्यांपैकी एक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा