Saturday, October 4, 2025

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर उत्पादने सहन खरेदी करता येण्याजोगी झाली आहेत. भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेत नवरात्रीमध्ये गेल्या एका दशकापेक्षा सर्वाधिक विक्री झाली. या उपाययोजनांमुळे केवळ किंमती कमी झाल्या नाहीत तर ग्राहकांच्या आकांक्षाही उंचावल्या. ज्यामुळे कुटुंबे नवीन वाहने घेण्यासाठी, घरगुती उपकरणांची खरेदी करण्यासाठी आणि जीवनशैलीच्या वस्तूंवर अधिक मुक्तपणे खर्च करण्यास सक्षम झाली. यामुळेच, सणासुदीच्या आनंदाचे विक्रमी विक्रीमध्ये रूपांतर झाले.

मारुती सुझुकीने १५०,००० वाहनांची नोंद केली असून २००,००० नोंदीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. एक्स. यू. व्ही. ७०० आणि स्कॉर्पिओ एन. सारख्या लोकप्रिय एस. यू. व्ही. विकणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या विक्रीत वर्षागणिक ६० टक्के वाढ झाली. दररोज प्रवास करणाऱ्या लोकांच्या उत्सुकतेमुळे या नवरात्रीत दुचाकीउत्पादक कंपनीहिरो मोटोकॉर्पच्या शोरूममधील गर्दी दुप्पट झाली आहे. टाटा मोटर्सने सणासुदीच्या काळात अल्ट्रोझ, पंच, नेक्सॉन आणि टियागो या मॉडेल्सच्या ५०,००० हून अधिक वाहनांची विक्री केली.

घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात, एलजी, हेअर आणि गोदरेज उपकरणांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या नवरात्रीतमध्ये विक्रीत दोन अंकी वाढ नोंदवली आहे. जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण करून अत्यावश्यक आणि महत्त्वाकांक्षी अशा दोन्ही वस्तूंवरील कराचा बोजा कमी करून सरकारने आत्मविश्वासाने खर्च करण्याचे वातावरण निर्माण केले. परिणामी, ब्रँड आणि किरकोळ विक्रेत्यांनी २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत विक्रीमध्ये अर्थव्यवस्थेला वाढ नोंदवली. यामुळे भारताच्या उपभोग-चालित मोठी चालना मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, ओणम, दुर्गापूजा आणि दसऱ्यापर्यंत पसरलेल्या सणासुदीच्या हंगामाच्या पहिल्या सहामाहीत एकूण सणासुदीच्या विक्रीचा ४०-४५% वाटा आहे, ज्यामुळे हा काळ देशातील सर्वांत मोठा उपभोग सक्षम काळ बनला आहे.

Comments
Add Comment