नवी दिल्ली / मुंबई (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नावाची शिफारसीनुसार मुंबई उच्च न्यायालयात नऊ अतिरिक्त न्यायमूर्तींची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या ५४ वरून ६३ झाली आहे.
केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी शनिवारी याबाबतची अधिसूचना जारी करत अतिरिक्त न्यायमूर्तींच्या निवडीला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्ती पदासाठी ॲड. किशोर संत, ॲड. वाल्मीकी मेन्झेस, ॲड. कमल खटा, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अरुण पेडणेकर, ॲड. संदीप मारने, ॲड. गौरी गोडसे, ॲड. राजेश पाटील आणि ॲड. आरीफ डॉक्टर यांच्या नावाची शिफारस केली होती.
त्या नावांना केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी मंजुरी दिली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची ९४ पदे असून सध्या ४५ कायमस्वरूपी व नऊ अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत आहेत.
प्रसाद ओकने नेमका कशावर व्यक्त केला संताप? मुंबई : हल्ली सोशल मीडियावर (Social media) इन्फ्लुएंसर्सची…
प्रवासी संघटनांनी व्यक्त केला संताप मुंबई : लोकल म्हणजे मुंबईकरांची (Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते.…
मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश; तर तीन जण जखमी अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या…
उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha)…
नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…
मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…