नवी दिल्ली : आयपीएल २०२४ चा पहिला भाग २२ मार्चपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला सामना सीएसके आणि आससीबी यांच्यात चेन्नई येथे खेळवला जाईल, तर शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ७ एप्रिल रोजी खेळवला जाईल.
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा दुसरा भाग भारताबाहेर आयोजित केला जाऊ शकतो, अशी अटकळ आता सुरू झाली आहे. बीसीसीआय आयपीएल २०२४ चा दुसरा टप्पा दुबईत आयोजित करण्याची योजना आखत आहे.
नुकत्याच १६ मार्चला भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करेल. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंचे पासपोर्ट घेतले आहेत, जेणेकरून जर आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत आयोजित केला गेला तर त्याची व्यवस्था लवकरात लवकर करता येईल. २०१४ च्या आयपीएलचा पहिला भाग देखील दुबईत निवडणुकीमुळे आयोजित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुसरा भाग दुबईत आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…