मुंबई : मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन रुपाली पाटील यांच्या जाण्याने पक्षाला फारसा फरक पडत नसल्याचे सूचित केले आहे. सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील।जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’, असा मजकूर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीला आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मंगळवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला होता. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत, असे रुपाली पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…