SA vs IND: सचिन तेंडुलकरकडून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक

Share

मुंबई: भारतीय संघाने केपटाऊनमधील कसोटीत दक्षिण आफ्रिकेला(south africa) ७ विकेटनी हरवले. या तऱ्हेने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यांमध्ये एखाद्या आशियाई संघाने पहिल्यांदा हरवले. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना बाद केले.

टीम इंडियाच्या या शानदार विजयावर माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. सोबतच त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे जोरदार कौतुक केले आहे.

एडन मार्करमने कमाल फलंदाजी केली मात्र जसप्रीत बुमराह…

भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट करत म्हटले, टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधल्याचे अभिनंदन. मात्र एडन मार्करमने कमालीची फलंदाजी केली कारण अनेकदा पिचवर आक्रमक अंदाजात खेळणे हा सर्वात चांगला पर्याय असतो. जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने दाखवून दिले की अशा प्रकारच्या विकेटवर कोणत्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली पाहिजे.

अशी झाली केपटाऊन कसोटी

टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५५ धावांवर आटोपला. भारतासाठी मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. या पद्धतीने टीम इंडियाला ९८ धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर संपला. यावेळेस जसप्रीत बुमराहने ६ विकेट मिळवले.

Recent Posts

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

27 mins ago

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

58 mins ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

2 hours ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

2 hours ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

3 hours ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

4 hours ago