Home ताज्या घडामोडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित आणि कोहलीने आपला शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळला होता. त्यानंतर दोघांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कोहली आणि रोहितने इंग्लंड दौऱ्याच्या आधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. यानंतर शुभमन गिलला कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीयला आधीच निवृत्ती घेतली आहे. दोन्ही खेळाडूंनी २०२४च्या भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत. आता कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होऊ शकतात.

बीसीसीआय शनिवारी ४ ऑक्टोबरला वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. कोहली आणि रोहितला वनडे संघात सामील करण्याची शक्यता आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यात पहिले तीन वनडे सामने १८ ऑक्टोबरपासून होणार आहेत. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

१९ ऑक्टोबर- पहिली वनडे, पर्थ
२३ ऑक्टोबर – दुसरी वनडे, अॅडलेड
२५ ऑक्टोबर – तिसरी वनडे, सिडनी
२९ ऑक्टोबर – पहिली टी-२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर- दुसरी टी-२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर – तिसरी टी-२०, होबार्ट
६ नोव्हेंबर – चौथी टी-२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर – पाचवी टी-२०, ब्रिस्बेन