कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या जोरदार पावसाने सोबत अनेक जलजन्य आजार आणलेत. या काळात सतत आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळं संसर्ग पसरण्याचा धोका वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टॉयफॉइड, कावीळ, तीव्र अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलयं.
पुण्यात यंदा जानेवारी महिन्यात दुषित अन्न व पाण्यातून गुलेन बॅरी सिड्रोम म्हणजे जीबीएस हा आजार पसरला होता. याची लागण झाल्यावर मेंदूविषयक गुंतागुंत होते. अतिसार व ओटीपोटात वेदना होतात. यामुळं महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. अनेक उपाययोजना होती घेतल्या. शहरात पावसामुळं जागोजागी पाण्याची डबकी साचल्यानं दुषित व घाण पाणी साचून राहते. यामुळं आजारांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात वाढलेल्या जलजन्य आजार वाढल्यानं सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा जानेवारी ते मे या महिन्यांत जलजन्य आजाराचे पाच हजार ६१७ रुग्र आढळले आहेत.
https://prahaar.in/2025/06/14/education-neet-ug-result-2025-declared-easy-steps-to-download-neet-ug-result-online-neet-final-answer-key-pdf-link/
कोणत्या आजाराचे किती रुग्ण आढळले ते पाहूया.
१. तीव्र अतिसार : ४ हजार २९२ रुग्ण
२. कावीळ : ६६
३. आमांश : १०६
४. विषमज्वर : ८६
५. लेप्टोस्पारेसिस : २
६. जुलाब : ९७६
७. गॅस्टो : ९५
काय आहेत जलजन्य आजाराची लक्षणे ते पाहूया…
ताप येणे, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधे दुखणे
नागरिकांनी उलट्या,जुलाब विषमज्वर हे आजार झाल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत हे उपचार उपलब्ध आहेत, असं आरोग्य विभागानं म्हटलयं.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- शुद्ध पाणी प्यावे. कूपनलिका, विहिर व कालव्याचे अशुद्ध पाणी पिऊ नये.
- शिळे व माशा बसलेले अन्न खाऊ नये.
- पाणी गाळून व २० मिनिटे उकळून व नंतर थंड करून प्यावे.
- पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. स्वच्छ करावेत.