Home क्रीडा IPL PBKS vs MI, Qualifier 2: पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात पाऊस पडेल काय? तर फायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या नियम!

PBKS vs MI, Qualifier 2: पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात पाऊस पडेल काय? तर फायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या नियम!

PBKS vs MI, Qualifier 2: पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात पाऊस पडेल काय? तर फायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या नियम!

PBKS vs MI, Qualifier 2 : आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने भिडणार आहेत. पंजाबला क्वालिफायर १ मध्ये पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईने एलिमिनेटर जिंकून आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. मात्र आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर अंतिम फेरीत कोण पोहोचणार?

सामना रद्द झाला तर काय?

या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. म्हणजेच, सामना जर पूर्णपणे रद्द झाला, तर त्याच दिवशी निर्णय व्हायला हवा. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

बीसीसीआयने यंदा नवीन नियम लागू केला आहे.

सामना सुरू करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. म्हणजेच, सामना रात्री ९ वाजेपर्यंतही सुरू होऊ शकतो, आणि त्यानंतरही ५–५ षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो.

मात्र, जर सामना पूर्णपणे रद्द झाला, आणि एकही चेंडू टाकता आला नाही, तर गुणतालिकेतील क्रम पाहून निर्णय घेतला जाईल.

https://prahaar.in/2025/06/01/ipl-2025-will-the-equation-rohit-champions-trophy-mumbais-ipl-trophy-match-up-once-again/

गुणतालिका काय सांगते?

संघ विजय गुण स्थान
पंजाब किंग्ज १९ १ला
मुंबई इंडियन्स १६ ४था

हवामानाचा अंदाज

  • सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
  • हवामान ३५ डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता.
  • वातावरण ढगाळ असले तरी पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.
  • त्यामुळे संपूर्ण २०–२० षटकांचा सामना होण्याची पूर्ण शक्यता आहे.

सामना रंगला तर दोन्ही संघ विजेतेपदासाठी झुंजतील, पण पावसाचा अडथळा आला आणि सामना रद्द झाला, तर श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्ज संघाला फायनलमध्ये थेट प्रवेश मिळेल.