बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला पहिले मोठे यश मिळाले आहे.
https://prahaar.in/2025/04/25/white-knight-corps-and-all-ranks-salute-braveheart-havaldar-jhantu-ali-shaikh-of-6-para-sf-who-made-the-supreme-sacrifice-during-a-counter-terror-operation/
ठोस माहिती मिळताच बांदीपोरात घेराव घालून भारताच्या सुरक्षा पथकांनी लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवून जवानांनी लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला.
https://prahaar.in/2025/04/25/one-terrorists-house-in-pahalgam-attack-case-was-blown-up-with-explosives-and-anothers-house-was-demolished-with-a-bulldozer/
अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर शुक्रवार २५ एप्रिल रोजी भारतीय सुरक्षा पथकाने बांदीपोरात लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले.