त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान का केले जाते?

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते.

यंदा कार्तिक पौर्णिमा ही  १५ नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे.

पौराणिक कथेनुसार भगवान शिवने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे.

१५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ

१६ नोव्हेंबर २०२४ मध्यरात्री २ वाजून ५८ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्ती

मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा मंदिरात लावा. तसेच दिवे लावताना त्यांची वेळ आणि दिशा ठरवा.

कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो, तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो.

मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान किंवा भातावरच ठेवला जातो.