मुंबई: पावसाळ्याच्या दिवसात सभोवताली पाणी साचल्यामुळे घरात आणि आसपास साप, उंदीर तसेच चिचुंदरी बाहेर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. चिचुंदरीमुळे घरात पसरणारी उग्र दुर्गंधी, आरोग्याला निर्माण होणारा आजारांचा धोका आणि घरातील इलेक्ट्रिक वायर किंवा कपडे कुरतडल्यामुळे होणारे नुकसान यामुळे अनेक कुटुंबे त्रस्त असतात. विशेषतः लहान मुले या प्राण्याला प्रचंड घाबरतात. अशा वेळी रासायनिक औषधांचा किंवा विषाचा वापर न करता, घरगुती साहित्याच्या मदतीने अवघ्या ५ मिनिटांत चिचुंदरी पळवून लावणारा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी नैसर्गिक उपाय समोर आला आहे.
https://prahaar.in/2026/07/30/special-court-sanctioned-for-ahilyanagar-to-try-atrocities-act-cases/
पुदिन्याचा उग्र वास ठरणार अत्यंत प्रभावी
चिचुंदरी आणि उंदरांना कोणत्याही धोकादायक रसायनाशिवाय घरातून हुसकावून लावायचे असेल, तर पुदिन्याची पाने आणि त्याच्या दांड्या अत्यंत उपयोगी ठरतात. चिचुंदरीची वास घेण्याची क्षमता अतिशय तीक्ष्ण असते. पुदिन्याचा तीव्र आणि उग्र वास या प्राण्यांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे पुदिन्याचा वास नाकात जाताच चिचुंदरी घराच्या आसपासही फिरकत नाही.
https://prahaar.in/2026/07/30/imd-monsoon-update-warning-of-extremely-heavy-rainfall-in-maharashtra-over-the-next-48-hours-meteorological-department-issues-high-alert-for-10-districts/
अवघ्या ५ मिनिटांत असा तयार करा घरगुती स्प्रे
हा नैसर्गिक उपाय तयार करणे अत्यंत सोपे असून यासाठी खालील टप्प्यांचा अवलंब करावा:
- प्रथम पुदिन्याची ताजी पाने किंवा त्याच्या दांड्या पाण्यात टाकून ५ मिनिटे चांगले उकळून घ्याव्यात.
- तयार झालेले हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर एका स्वच्छ स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवावे.
- हा स्प्रे घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये, दारांमागे आणि विशेषतः चिचुंदरी शिरण्याची शक्यता असलेल्या सर्व गुप्त जागांवर फवारावा.
- स्प्रे उपलब्ध नसल्यास, पुदिन्याची ताजी पाने थेट कोपऱ्यांमध्ये ठेवूनही चिचुंदरीला सहज पळवून लावता येते.
https://prahaar.in/2026/07/30/chandrashekhar-bawankule-abhijit-dipke-should-reveal-the-names-of-the-bjp-leaders-who-issued-threats/
सुरक्षिततेसाठी या महत्त्वाच्या गोष्टींची घ्या काळजी
केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता पावसाळ्यात घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील सर्व अन्नपदार्थ नेहमी व्यवस्थित झाकून ठेवावेत आणि कचरापेटी रोज न चुकता साफ करून झाकून ठेवावी. याशिवाय, घराच्या खिडक्या आणि दारांना बारीक जाळ्या बसवून घेतल्यास चिचुंदरी किंवा इतर कीटक घरात शिरण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो, ज्यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित राहते.