Home महाराष्ट्र नाशिक Nashik : ‘दुतोंड्या मारुती’ बुडाला, गंगापूर धरणातील पाणी विसर्गात वाढ

Nashik : ‘दुतोंड्या मारुती’ बुडाला, गंगापूर धरणातील पाणी विसर्गात वाढ

0
Nashik :  ‘दुतोंड्या मारुती’ बुडाला,  गंगापूर धरणातील पाणी विसर्गात वाढ

Nashik : नाशिक शहर आणि परिसरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र तीन दिवस सुरु असलेल्या संततधार मुसळधार पावसाने नाशिक शहराला अक्षरश झोडपून काढले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता होत असेलल्या विसर्गात ४७५ क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणातून एकूण १४४०७ क्युसेक वेगाने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे.

https://prahaar.in/2026/07/24/major-theft-in-sachin-ahirs-mumbai-house-2-65-crore-rupees-in-lieu-of-lamps-domestic-workers-are-suspicious/

गंगापूर धरणातून पाणी विसर्गात वाढ

सकाळी पाण्यामुळे गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीच्या चेहऱ्यापर्यंत पुराचे पाणी आले आहे होते, दरम्यान आता दुतोंड्या मारुती बुडाला आहे. नदीकाठच्या भांडी बाजारात पाणीस शिरले असून सराफ बाजारात देखील पाणी शिरले आहे. गुरुवारी गंगापूर धरणातून करण्यात येणारा विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सकाळी रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत असलेले पाणी सायंकाळी मानेपर्यंत पोहचले. तर आज मारुती बुडाला आहे. नदीपात्रातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली. रामसेतू पुलावरुन पाणी जात आहे. तर इकडे ग्रामीण भागात गोदावरीचे पाणी निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये शिरले आहे.

https://prahaar.in/2026/07/24/pune-metro-pune-residents-metro-travel-set-to-go-high-tech-smart-ticketing-system-launched-on-line-3/

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या काही किरकोळ विक्रेत्यांना आपल्या टपऱ्या, हातगाड्या हलविण्यासही संधी मिळाली नाही. त्या पुराच्या पाण्यात अडकून राहिल्या. गोदावरीचा पूर पाहण्यास नागरिक अहिल्यादेवी होळकर पुलावर गर्दी करीत असल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविताना कसरत करावी लागत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुरामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास प्रशासन समर्थ असून नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here