मुंबई : मुंबईत (Mumbai) कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) परिणाम आता जलाशयांतील (Reservoirs) पाणीसाठ्यावर (Water Stock) स्पष्टपणे दिसून येत आहे. बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ या २४ तासांच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांतील एकूण पाणीसाठा ६९.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
या २४ तासांत जलाशयांतील पाणीसाठ्यात ७.८४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलाशयांमध्ये पाण्याची आवक वाढल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
https://prahaar.in/2026/07/23/pm-narendra-modi-prime-minister-modi-finally-speaks-on-the-paper-leak-issue-fast-track-court-announced-major-assurance-given-to-protesting-students/
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठ्यात झालेली ही वाढ शहरासाठी दिलासादायक मानली जात आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम एकूण साठ्यावर दिसून आला आहे.
दरम्यान, कालपासून मुंबईत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. आजही शहरात पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने (India Meteorological Department-IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.