Home ब्रेकिंग न्यूज Historical Heritage : ‘सर्पाकार’ दरवाजे आणि ‘विंचूकाटा’ माचीमुळे लोहगड किल्ल्याला जागतिक ओळख

Historical Heritage : ‘सर्पाकार’ दरवाजे आणि ‘विंचूकाटा’ माचीमुळे लोहगड किल्ल्याला जागतिक ओळख

0
Historical Heritage : ‘सर्पाकार’ दरवाजे आणि ‘विंचूकाटा’ माचीमुळे लोहगड किल्ल्याला जागतिक ओळख
lohagad

पुणे: पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे. किल्ल्याची अद्वितीय वास्तुकला, विशेषतः सर्पाकार दरवाजांची रचना आणि विंचूकाटा माची या वैशिष्ट्यांमुळे लोहगड जागतिक नकाशावर चमकला आहे. इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी या किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि स्थापत्यविषयक महत्त्वावर प्रकाश टाकला आहे.

https://prahaar.in/2026/06/25/chandrashekhar-bawankule-government-cracks-down-hard-on-the-stamp-duty-scam-special-inquiry-into-cases-from-the-past-five-years-across-the-state/

दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास:

लोहगडाचा इतिहास तब्बल दोन हजार वर्षांहून अधिक जुना आहे. शिवपूर्व काळापासून हा किल्ला विविध सत्तांच्या ताब्यात होता. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, बहमनी, निजामशाही आणि आदिलशाही अशा अनेक राजवटी या गडाच्या साक्षीदार आहेत. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. त्यानंतर पुरंदरच्या तहानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला, परंतु १३ मे १६७० रोजी मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून स्वराज्याचे तोरण पुन्हा एकदा फडकवले. मोगल, मराठे, पेशवे ते इंग्रज अशा अनेक सत्तांतरांचा हा गड साक्षीदार आहे.

https://prahaar.in/2026/06/25/footballer-alisha-lehmann-worlds-most-glamorous-footballer-set-to-tie-the-knot-soon-photos-of-romantic-beach-proposal-go-viral/

पर्यटनासाठी सहजसुलभ:

लोहगड हा राज्यातील सर्वाधिक सहजपणे गाठता येणाऱ्या किल्ल्यांपैकी एक आहे. लोहगडवाडीतून केवळ १५ ते २० मिनिटांत गडावर पोहोचता येते. समुद्रसपाटीपासून १,०१२ मीटर उंचीवर असलेला हा किल्ला सर्व वयोगटांतील पर्यकांसाठी अत्यंत सोयीचा ठरला आहे. रेल्वे आणि रस्त्यांच्या उत्तम जोडणीमुळे पुणे आणि मुंबईतील पर्यटकांची येथे मोठी वर्दळ असते.

https://prahaar.in/2026/06/25/mp-sanjay-dina-patil-mp-sanjay-dina-patil-verbally-abuses-journalists/

शौर्यस्थळांचे पावित्र्य राखण्याचे आवाहन:

किल्ल्यांवर वाढणाऱ्या मनोरंजनप्रधान पर्यटनाबाबत संदीप तापकीर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “किल्ले ही आपली शौर्यस्थळे आहेत. आज केवळ मौजमजा, सेलिब्रेशन किंवा वैयक्तिक कार्यक्रमांसाठी किल्ल्यांचा वापर होणे ही दुर्दैवी बाब आहे. शौर्यभूमींचे रूपांतर केवळ पर्यटनस्थळांमध्ये झाल्याने त्यांचे ऐतिहासिक पावित्र्य धोक्यात येत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.”

https://prahaar.in/2026/06/25/high-level-joint-meeting-of-the-state-government-now-for-thane-districts-water-planning/

ठळक वैशिष्ट्ये:

  • स्थापत्य शैली: गडाचे सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा माची पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र.

  • ऐतिहासिक महत्त्व: दोन हजार वर्षांचा इतिहास आणि अनेक सत्तांतरांचा साक्षीदार.

  • सद्यस्थिती: ऐतिहासिक वारशाचे पावित्र्य जपण्याचे इतिहास अभ्यासकांकडून आवाहन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here