नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपतींनी तो तात्काळ मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनाने मंगळवारी (२३ जून) याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यामुळे कुरियन यांची केंद्रीय मंत्रिमंडळातील कारकीर्द सध्या तरी संपुष्टात आली आहे. (George Kurien)
जॉर्ज कुरियन हे केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दोन्ही मंत्रालयांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. (George Kurien)
https://prahaar.in/2026/06/23/world-bank-major-announcement-by-the-world-bank-for-india-where-exactly-will-the-1-5-billion-fund-be-utilized/
संविधानातील तरतुदीनुसार मंजूर झाला राजीनामा :
राजीनाम्यामागचं नेमकं कारण काय?
जॉर्ज कुरियन हे लोकसभा सदस्य नसून राज्यसभेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात दाखल झाले होते. मात्र त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. भारतीय संविधानानुसार, मंत्रीपदावर कायम राहण्यासाठी संबंधित व्यक्ती संसदेतल्या कोणत्यातरी सभागृहाची सदस्य असणे आवश्यक असते. यावेळी भाजप नेतृत्वाने कुरियन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली नाही. परिणामी त्यांचे संसदीय सदस्यत्व संपले आणि नियमांनुसार त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. (George Kurien)
https://prahaar.in/2026/06/23/impact-of-tension-in-hormuz-crude-oil-prices-rise-again-check-the-new-rates-for-petrol-and-diesel/
केरळ निवडणुकीच्या निकालांचाही परिणाम?
कुरियन यांनी पक्षाच्या आदेशानुसार केरळ विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे केवळ घटनात्मक कारणेच नव्हे, तर पक्षांतर्गत राजकीय समीकरणांचाही प्रभाव असू शकतो, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या जागी मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. (George Kurien)