नवी दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर (NEET Paper Leak 2026) केंद्र सरकार आता मोठी आणि कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी आगामी नीट परीक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी थेट भारतीय लष्कराकडे (Indian Army) सोपवण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सूत्रांकडून समजते.
https://prahaar.in/2026/05/28/mumbai-in-minutes-concept-gains-momentum/
दरम्यान, दुसरीकडे सीबीआयने (CBI) पेपरफुटी प्रकरणात तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून, अटक आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अलीकडील दोन्ही अटक महाराष्ट्रातून झाल्याने राज्यातील कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. (NEET Paper Leak 2026)
https://prahaar.in/2026/05/28/tension-at-durgadi-fort-in-kalyan-bjp-shinde-group-protests-against-namaz/
या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह देशभरातील तब्बल 49 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन, हार्डडिस्क आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. (NEET Paper Leak 2026)
https://prahaar.in/2026/05/28/bihar-boat-accident-tragedy-2-brutally-killed-7-critically-injured-5-missing-over-14-passenger-boat-overturns-ganga-river-barh-bihar-latest-accident/