नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत (Suryakant) यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या वादग्रस्त मुद्द्यावर याचिकाकर्त्यांना अतिशय भावनिक प्रतिक्रिया देऊ नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी चर्चा झाली.
https://prahaar.in/2026/05/25/buldhana-father-ends-his-life-by-pushing-4-children-into-a-well/
मात्र, यावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे इतके भावनिकतेने घेऊ नका.” तसेच या प्रकरणात तातडीची कोणतीही गरज नसून, सर्वोच्च न्यायालय नियमांनुसार योग्य वेळी सुनावणी करेल, असेही त्यांनी नमूद केले.
ही जनहित याचिका न्यायालयीन संवादांचा व्यावसायिक वापर थांबवावा आणि बनावट पदवीधारक वकिलांवर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी घेऊन दाखल करण्यात आली होती. याशिवाय, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक ऑनलाइन मोहिमेविरोधातही सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/25/novak-djokovic-makes-strong-start-at-french-open-2026-takes-winning-step-towards-25th-grand-slam/
दरम्यान, न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाकडे कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीत पाहावे, असे संकेत देत तातडीच्या हस्तक्षेपास नकार दिला आहे.
या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून घरगुती वाद, मानसिक ताण किंवा आर्थिक विवंचना या कारणांमधून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे.