मुंबई : मुंबई मेट्रो रेल मर्यादित (एमएमआरसी) मेट्रो-३ (अॅक्वा लाईन) मार्गिकेवरील मोबाईल नेटवर्क सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीचे अधिकार प्रदान केले आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना मोबाईल नेटवर्कबाबत भेडसावणाऱ्या समस्या दूर होणार आहेत.
https://prahaar.in/2026/05/22/mumbaikars-growing-inclination-towards-ac-local-passenger-numbers-on-harbour-line-increase-by-65-percent/
भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना भूमिगत स्थानके व बोगद्यांमध्ये आयबीएस प्रणाली उभारणे, संचालन व देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा अखंड व्हॉइस व डेटा कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार असून सर्व दूरसंचार सेवा प्रदाते लवकरच स्थानके व बोगद्यांमध्ये सिग्नल सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, अखंड आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
https://prahaar.in/2026/05/22/extension-of-block-on-platforms-16-and-17-at-chhatrapati-shivaji-maharaj-terminus/
भुयारी प्रवासात इंटरनेट नसल्यामुळे प्रवाशांना ‘मेट्रो ॲप’द्वारे ई-तिकीट काढताना किंवा युपीआय पेमेंट करताना प्रचंड अडचणी येत आहेत.सुरक्षा आणि संपर्क: मेट्रो मार्ग जमिनीखाली सरासरी १८ मीटर खोल आहे. अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत नातेवाईकांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. प्रवासादरम्यान कार्यालयीन कामे किंवा मनोरंजनासाठी इंटरनेट वापरणे शक्य होत नाही.