मंत्री नितेश राणे यांचा इशारा; जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनावरही केली बोचरी टीका
मुंबई : “राज्यात जिहादी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही. निदा खान प्रकरणात सातत्याने जिहादची पाठराखण करणारा एमआयएमचा माजी खासदार इम्तियाज जलील हाच या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे त्याची जागा बाहेर नसून जेलमध्ये आहे. येत्या काही दिवसांतच त्याच्या अटकेचा नारळ फुटेल, असा दावा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केला.
https://prahaar.in/2026/05/13/mulayam-singh-son-prateek-yadav-passes-away-at-the-age-of-38-lucknow/
मुरुड येथे माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. निदा खान प्रकरणावर भाष्य करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “निदा खानला ज्या घरात आश्रय देण्यात आला होता, त्या घराचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. हे ‘देवाभाऊंचे’ सरकार आहे. महाराष्ट्रात जर कोणी ‘जिहाद’ करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर ‘देवाभाऊंचा बुलडोझर’ चालल्याशिवाय राहणार नाही.”
इम्तियाज जलील यांच्या अटकेबाबत बोलताना ते म्हणाले की, मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली मागणी रास्त आहे. ‘महाराष्ट्र को हरा कर देंगे’ अशी प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या जलील यांनी सातत्याने जिहादी मानसिकतेची बाजू घेतली आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर येण्यासाठी त्यांची अटक आवश्यक असल्याचे राणे यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/13/nashik-tcs-case-mim-corporator-matin-patel-s-house-demolished-for-sheltering-nida-khan-chhatrapati-sambhajinagar-news/
आव्हाडांचे आंदोलन म्हणजे ‘शोबाजी’
इंधनाचा वापर कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केले होते. याविषयी विचारले असता राणे म्हणाले की, “पंतप्रधानांनी हे आवाहन कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून नव्हे, तर देशाचे प्रमुख म्हणून केले होते. भविष्यात परकीय चलन साठा (फॉरेक्स) आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे संकट लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. मात्र, यात देशहिताऐवजी राजकारण शोधणे दुर्दैवी आहे. घोड्यावरून फिरून आंदोलन करणे ही मीडियासाठीची ‘शोबाजी’ असून, अशा कृत्यांमुळे आव्हाड स्वतःच्या भारतीय असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.”
मुरुडमध्ये नवीन जेट्टीचे उद्घाटन