पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर झाला. निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. या घटनेला ४८ तास उलटत नाहीत तोच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. ममता बॅनर्जींना निवडणुकीत हरवणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या झाली. अतिशय जवळून अधिकारी यांच्या पीएवर गोळ्या झाडण्यात आल्या.
https://prahaar.in/2026/05/04/bjp-secures-absolute-power-in-west-bengal-mamata-banerjee-defeated-in-assembly-elections/
शुभेंदू अधिकारी यांच्या PA ची हत्या
https://prahaar.in/2026/05/06/west-bengal-election-2026-violence-breaks-out-in-west-bengal-after-elections-election-commission-issues-strict-warning/
चंद्रनाथ रथ हे शुभेंदू अधिकारी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहत होते. भवानीपूर विधानसभा निवडणुकीत एक महत्वाचे सदस्य म्हणू त्यांची नियुक्ती केली गेली होती. शिवाय एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.
या घटनेनंतर बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ‘राजकीय हत्येच्या दृष्टीने या घटनेकडे पहिले जात आहे. चंद्रनाथ रथ यांची हत्या ही पूर्वनियोजित होती, त्यांच्या पाठलाग करून त्यांची हत्या केली, या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात आहे, असा आरोप भाजपचे नेते अर्जुन सिंग यांनी केला आहे.
या घटनेनंतर शुभेंदू अधिकरी यांच्या प्रतिक्रिया
माझ्या सहाय्यकाच्या हत्येबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना माहिती दिली आहे. माझ्या सहाय्यकाव्यतिरिक्त, बसीरहाट येथे आमच्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला, तर बारानगर येथे दुसऱ्या एका कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. माझ्या सहाय्यकाच्या या निर्घृण हत्येचा पोलीस तपास करतील, असे आश्वासन पोलीस महासंचालकांनी (DGP) मला दिले आहे.