पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर आता भारत निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
https://prahaar.in/2026/05/06/supreme-court-news-the-number-of-judges-in-the-supreme-court-will-increase-important-decision-of-the-central-government/
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या तक्रारी सतत येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, कोलकाता पोलीस आयुक्त तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
https://prahaar.in/2026/05/06/pune-parvati-crime-news-pune-shaken-again-50-year-old-man-attempts-to-rape-9-year-old-girl-grandfather-rapes-granddaughter/
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवडणुकीनंतर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवले जाईल. लोकशाही प्रक्रियेनंतर अशा प्रकारच्या घटनांना कोणतीही जागा नसल्याचेही आयोगाने ठामपणे नमूद केले आहे.