नवी मुंबई : राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबईतील वाशी एपीएमसी (APMC) फळ बाजारात सध्या कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तानंतर कोकणातून हापूसच्या पेट्या दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आवक वाढूनही आंब्याचे दर मात्र स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
मागणी आणि पुरवठ्याचा समतोल
कोकणच्या हापूसचा बाजारात दबदबा
https://prahaar.in/2026/04/08/assam-meghalaya-flag-high-tariff-refuse-extra-power-from-subansiri/
रत्नागिरी, देवगड आणि रायगड या पट्ट्यातून दररोज हजारो पेट्यांची आवक वाशी बाजारात होत आहे. यावर्षी आंब्याचा दर्जा चांगला असल्याने आणि फळ लांबट व रसाळ असल्याने खवय्यांची पहिली पसंती कोकणच्या हापूसला मिळत आहे. दर्जेदार हापूस आंबे स्थिर दरात मिळत असल्याने किरकोळ विक्रेते आणि सामान्य ग्राहक दोघांकडूनही खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
पुढील महिनाभर आंबा स्वस्त होण्याची चिन्हे कमी
बाजारातील जाणकारांच्या मते, मे महिना हा आंब्याचा मुख्य हंगाम असतो. सध्या सुरू असलेली आवक पाहता, पुढील किमान महिनाभर तरी दर याच स्तरावर राहण्याची शक्यता आहे. “आवक वाढली असली तरी मागणीही तितकीच जोरदार आहे, त्यामुळे दर कोसळण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही,” असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
ग्राहकांसाठी मेजवानी
आगामी काळात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने आंब्याची गोडी अजून वाढणार आहे. स्थिर दरांमुळे सर्वसामान्यांनाही आता ‘हापूस’चा आस्वाद घेणे सहज शक्य झाले आहे. एकूणच, एपीएमसी बाजारात सध्या ‘फळांचा राजा’ भाव खाऊन जात असून हंगाम अधिक रंगतदार वळणावर पोहोचला आहे.