नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने बिथरून केलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने कठोर प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री जम्मू, पठाणकोट, जैसलमेर आणि पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. यावेळी पाकिस्तानचे लक्ष जम्मू विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि सीमावर्ती भाग होते. मात्र भारताची अत्याधुनिक S-400 डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आणि अनेक ड्रोन हवेतच उडवण्यात आले.
या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने प्रतिहल्ला करत जम्मूत दोन JF-17 आणि राजस्थानमध्ये एक F-16 पाकिस्तानी लढाऊ विमानं पाडली. ही माहिती पाकिस्तानच्या लष्करानेही अखेर कबूल केली आहे.
https://prahaar.in/2025/05/08/ndia-pak-tensions-jammu-air-sirens-sounded-blackout-imposed-drone-explosion-sound/
हल्ल्यानंतर जम्मू, राजस्थानच्या सीमावर्ती भागांत ब्लॅकआउट करण्यात आला. सायरन वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आलं, आणि सैन्याने संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. S-400 प्रणालीने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले.
गुरुवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला आणि भारतातील १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केली. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण पसरलं आहे.
JF-17 ही चीनने पाकिस्तानला दिलेली लढाऊ विमाने असून ती भारताच्या प्रत्युत्तरात निष्प्रभ ठरली. भारताशी कुरघोडी केल्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…