‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

Share

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

बैठकीला गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या ऑपरेशनमध्ये सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.

https://prahaar.in/2025/05/08/india-counters-pakistan-escalation-bid-destroys-air-defence-system-in-lahore/

बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी खुलासा केला की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; पाकिस्तानविरोधातील कारवाई सुरूच आहे. यावेळी सर्व पक्षांनी सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत एकात्मता दर्शवली.

राहुल गांधी यांनी बैठकीत विशेष संसदीय अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. यावर सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, केंद्राने स्पष्ट केले की, भारताला युद्ध नको, पण जर पाकिस्तानकडून काही अतिक्रमण झाले, तर त्याला “दहापट उत्तर” दिले जाईल.

Recent Posts

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

40 seconds ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

23 minutes ago

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

1 hour ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

2 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

3 hours ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

3 hours ago