नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर देशातील उत्तर आणि पश्चिम भागातील कमीत कमी १८ विमानतळे बंद करण्यात आली. यात श्रीनगर, लेहर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धरमशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर भारताच्या मिसाईल हल्ल्यानंतर धरमशाला विमानतळ अस्थायी रूपाने बंद झाल्यानंतर आयपीएलच्या संघांचा प्रवास प्रभावित झाला आहे. धरमशालामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. यानंतर ११ मेला पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील ११ मेचा सामना मुंबईत शिफ्ट होऊ शकतो.
धरमशाला पंजाब किंग्स संघाचे दुसरे घरगुती मैदान आहे. पंजाब संघाला प्रवासासंबंधी कोणताही त्रास नाही. कारण ते या आठवड्याच्या अखेरीपर्यंत ते तिथेच राहतील. मुंबई संघाचा प्रवासाचा कार्यक्रम अजूनही अनिश्चित आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळेस सर्व काही अनिश्चित आहहे. संघांशी बातचीत सुरू आहे.
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…