मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यातील सामना अनिर्णीत ठरला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना केवळ एकच गुण मिळाला. मात्र यामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत. जाणून घेऊया की आता आयपीएलच्या प्लेऑफचे समीकरण काय असणार आहे…
या सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये जबरदस्त बदल झाले आहेत. दिल्लीच्या संघाला एक गुण मिळाला आहे आणि ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. आतापर्यंत दिल्लीने ११ सामने खेळले आहेत आणि ६ विजयासह त्यांचे १३ गुण आहेत. म्हणजेच आता दिल्लीचे ३ सामने बाकी आहे आणि प्लेऑफच्या आशा कायम आहेत.
तर हैदराबादचा संघ ११ सामन्यांमध्ये ७ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. म्हणजेच जर हैदराबादने आपलेले उरलेले ३ सामने जरी जिंकले तरी त्यांचे एकूण १३ अंक होतील. म्हणजेच हैदराबादच्या आशा संपल्या आहेत. राजस्थान आणि चेन्नई नंतर आता हैदराबादचा तिसरा संघ आहे जो प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
सध्याच्या वेळेस पॉईंट्सटेबलमध्ये आरसीबीचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांचे ११ सामन्यात ८ विजयासह १६ गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहेत. त्यांचे ११ सामन्यांत ७ विजयासह १५ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर मुंबईचा संघ आहे. त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. गुजरातचा संघ १० सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
सगळ्यात तगडी टक्कर कोलकाता आणि लखनऊ यांच्यात आहे. कोलकाताचे ११ सामन्यांत ११ गुण आहेत. म्हणजेच उरलेल्या ३ सामन्यांत केकेआरने विजय मिळवला तर त्यांचे १७ गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. तर लखनऊच्या संघाचे अजूनही १० गुण आहे आणि ३ सामने बाकी आहेत. ते जर सर्व सामने जिंकले तर त्यांचेही १६ गुण होतील.
हैदराबाद आणि दिल्लीच्या या सामन्याने आता प्लेऑफची शर्यत अधिक रोमहर्षक झाली आहे.
Gautami Patil Item Song: महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना, गौतमी पाटीलला कोण नाही ओळखत. 'सबसे कातील गौतमी…
Very Parivarik Trailer launched: बहुप्रतिक्षित कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित…
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतात…
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला…
जम्मू आणि काश्मीर: भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरात 7 मे च्या पहाटे, नऊ कुख्यात…
लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर…