MI vs GT, IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर महत्वपूर्ण लढत

Share

मुंबई(सुशील परब): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स वानखेडे स्टेडियमवर आज महत्त्वपूर्ण लढत होत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत समान गुणांवर आहेत (चौदा गुण) जो संघ विजयी होईल तो गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाईल. मुंबई इंडियन्सने सलग सहा विजय मिळविलेले आहेत, त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. गुजरात टायटन्स पण काही कमी नाही त्यांनी दहा सामन्यात सात विजय मिळविलेले आहेत त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल यात शंकाच नाही.

रोहीत शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक बर्मा हे फलंदाज फॉर्मात आहेत त्यामुळे त्यांची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीही चांगली होत आहे. जसप्रित बुमराह, टेंट बोल्ट, दोपक चहर, कर्ण शर्मा, मिचेल सेंटनर असे चांगले गोलंदाज मुंबईच्या संघात आहेत. गुजरात संघाला देखील कमी लेखून चालणार नाही त्यांचे साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, ज्योस बटलर, शाहरुख खान हे सातत्याने धावा करत आहेत.

गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, कैसिगो रबाडा, रशिद खान, वाशिग्टन सुंदर, प्रसिद्ध क्रिष्णा असे चांगले गोलंदाज आहेत वानखेडे स्टडियम हे फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल. अगोदरच्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव केला होता, आज मुंबई त्या पराभवाचा बदला घेणार? बघुया गुजरात टाषटन्स मुंबई इंडियन्सला रोखेल का की मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला हरवून सातवा विजय मिळवतो का ते पाहूया.

Recent Posts

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…

9 minutes ago

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगांचा भारत दौरा

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…

28 minutes ago

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

45 minutes ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

1 hour ago

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

2 hours ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

3 hours ago