नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. यातच सोशल मीडियावर भडकावणारी तसेच अपमानजनक पोस्ट शेअर केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये यात कारवाईही झाली मात्र आता याबाबत संसदेच्या स्थायी समितीने रिपोर्ट जारी केला आहे.
संसदेच्या स्थायी समितीने म्हटले की, २२ एप्रिल २०२५मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म राष्ट्रहिताविरोधात कार्य करत आहे. यामुळे हिंसा भडकू शकते.
समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, देशहिताविरोधात काम करणारे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर आयटी कायदा २००० आणि सूचना प्रौद्योगिकी नियम २०२१ अंतर्गत अशा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी काय कारवाई करण्यात आली आहे आणि काय केली जाणार आहे, याची माहिती दिली जावी.
रिपोर्ट्सनुसार समितीने ८ मेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच सूचना प्रसारण मंत्रालयाकडून माहिती घेण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…