शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर ‘सर्वोच्च’ सुनावणी

Share

नवी दिल्ली : पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या वादावर तोडगा काढून निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले. या निर्णयांविरोधात उद्धव आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मे महिन्यात उद्धव आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे

उद्धव गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे / शिउबाठा) शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी शिवसेना कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शरद पवार गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार / राशप) राष्ट्रवादी काँग्रेस या नावावर आणि गजराचे घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून गजराचे घड्याळ वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

30 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago