Share

हलकं-फुलकं – राजश्री वटे

अपेक्षा कशाकशाची…? हे न संपणारं ओझं आहे!!
मनुष्य जीवन जगत राहतो आणि नको त्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर पेलत असतो. पण खरंच, हे ओझं घेण्याची गरज असते का… नाही ना? विचार केला की ओझं वाटणाऱ्या अपेक्षाच जर ठेवल्या नाहीत, तर जगणं किती सुखाचं होईल.
पण तसं होत नाही ना…

एक तर दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहायचं… नाहीतर दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आयुष्य खर्ची घालायचं… सगळंच कसं साध्य होईल मग त्याचं ओझं बाळगत बसायचं. खूप गोष्टी अपेक्षा असतानाही, पात्रता असूनही वाट्याला येत नाहीत, त्याचं कौतुक होत नाही किंवा त्याप्रमाणे सन्मान मिळत नाही… म्हणून खचून जायचं नाही… सोडून द्यायचं… याचा अर्थ असा नाही की पात्रता नव्हती म्हणून किंवा कमतरता होती म्हणून… किंवा समोरची व्यक्ती जास्त श्रेष्ठ होती म्हणून विचार करत बसायचं, त्रास करून घ्यायचा व अपेक्षाभंगाचं दुःख कुरवाळत बसायचं नाही… हे तिथेच सोडून द्यायचं व पुढे जायचं !

ही ज्याला त्याला मिळालेली संधी असते… यावरून कोणी कमी किंवा कोणी मोठं असं ठरत नसतं… अशावेळी पुढच्या संधीची वाट पाहावी व दुसऱ्याचं कौतुक करण्याचा मोठेपणा नक्कीच अंगीकारावा! पुढे गेलेल्याचा द्वेष न करता हे त्याच्या नशिबात होतं त्याला मिळालं… हे त्याचं प्रारब्ध होतं, त्याला मिळालं हे स्वीकारता आलं पाहिजे व प्रयत्न करत करत पुढे जाता आलं पाहिजे! कोणाची रेषा लहान न करता स्वतःची रेष मोठी कशी करता येईल असा विचार केला, तरच अपेक्षांचं ओझं न वाटता यश तुमचा पाठलाग नक्कीच करेल व तिथपर्यंत पोहोचण्याची स्वतःचीच स्वतःबद्दल असलेली अपेक्षा पूर्ण करता येईल. कोणाकडूनही खूप अपेक्षा केल्या तर स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेणं हा मनुष्य स्वभाव! त्यापेक्षा कोणाकडूनही अपेक्षा करू नये… आणि कोणाच्याही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करू नये… नाहीतर पदरी निराशाच येणार !

या अपेक्षांमध्ये कधी कधी द्वेष उत्पन्न होतो व द्वेष करणारा नेहमीच खुजा ठरतो व निरपेक्ष भावनेनं कौतुक करणारी, प्रोत्साहन देणारी सदैव उंची गाठते!!निरपेक्ष जीवन जगणं हा सुखाचा मुलमंत्र नक्कीच आहे… आयुष्यात अपेक्षांचा हिशोब मांडूच नये कधी!!
ना रहेगी अपेक्षा…
ना मिलेगा दुःख…
आनंदी राहा… आनंदी जगा!!

Recent Posts

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

1 minute ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

10 minutes ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

33 minutes ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

55 minutes ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

58 minutes ago

पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…

1 hour ago