Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीHealth Tips : रात्री जेवल्यानंतर करा या ३ गोष्टी; चरबी आणि लठ्ठपणा...

Health Tips : रात्री जेवल्यानंतर करा या ३ गोष्टी; चरबी आणि लठ्ठपणा निघून जाईल

मुंबई : तुमचं वजन वेगाने वाढत आहे. पोटाच्या चरबीची काळजी वाटत असेल तर आता काळजी करू नका. काही दिवसातच तुमचा लठ्ठपणा नाहीसा होईल. रात्री जेवण केल्यानंतर तुम्ही काय करता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. वाढती चरबी आणि लठ्ठपणा अशा समस्या असतील तर टेन्शन घेऊ नका. काही दिवसांतच तुमचे पोट कमी होईल आणि तुमचा लठ्ठपणाही, तुमचे पोट सपाट दिसू शकते आणि तुमची चरबी कमी होऊ शकते अशा तीन गोष्टी जाणून घ्या

कोमट पाणी प्या

जेवणानंतर सुमारे ३० मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी पिणे जादूसारखे काम करते. यामुळे चयापचय गतिमान होते, अन्न लवकर पचते आणि पोटाची चरबी वितळू लागते. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका, थोडे अंतर ठेवा.

रात्री उशिरा मोबाईलकडे पाहू नका

जेवण केल्यानंतर तासनतास मोबाईलकडे पाहत राहिल्यास झोपेचा त्रास होतो आणि चयापचय देखील मंदावतो. कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढतो, हार्मोनल असंतुलन होते, चरबी जाळली जात नाही. म्हणून, जेवल्यानंतर १ तासानंतर फोन दूर ठेवा आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.रात्रीचे जेवण लवकर करा: तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरातील चरबी वेगाने वाढते. म्हणून, रात्रीचे जेवण ७-८ वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पचनक्रियेला वेळ मिळेल. यामुळे, पोट अन्न चांगले पचवते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि चरबी लवकर नाहीशी होते.

https://prahaar.in/2025/05/03/virat-kohli-on-verge-of-breaking-5-different-records-in-rcb-vs-csk-ipl-match/

५ मिनिटे स्ट्रेचिंग करा

जर तुम्हाला चालता येत नसेल, तर तुम्ही 5 मिनिटे अंथरुणावर साधे स्ट्रेचिंग किंवा योगा करून चरबी कमी करू शकता. सुप्त बद्धकोनासन, पवनमुक्तासन, झोपून भिंतीवर पाय वर करणे. ही आसने आरामदायी आहेत आणि पचन सुधारण्यास तसेच चांगली झोप घेण्यास मदत करतात.

जेवणानंतर १५-२० मिनिटे चालणे: सर्वात मोठी चूक म्हणजे जेवणानंतर सरळ झोपणे. यामुळे अन्न नीट पचत नाही आणि चरबीमध्ये बदलते, परंतु जर तुम्ही १० मिनिटे खाल्ल्यानंतर १५ ते २० मिनिटे हळू चालत राहिलात तर पचनशक्ती मजबूत होते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, पोट फुगणे कमी होते आणि चरबी साठवणे थांबते. म्हणून, तुमचा मोबाईल सोडून काही वेळ मोकळ्या आकाशाखाली फिरायला जा, यामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल आणि लठ्ठपणाही कमी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -