श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) रामबन जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी चष्मा येथे लष्कराची गाडी घसरुन थेट ७०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात (Jammu Kashmir Accident) घडला. या घटनेत तीन सैनिकांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर लगेच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच पोलिसांनी या घटनेची एफआयआर दाखल केली आहे.
https://prahaar.in/2025/05/04/is-eating-gram-flour-poli-for-breakfast-beneficial-for-health-or-not-find-out/
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.४) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून २०० ते ३०० मीटर दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. अपघअताची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्र मिळून बचाव कार्य सुरु केले. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असून ट्रकमधील उपस्थित असलेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजित कुमार आणि मान बहादूर असे तिन्ही जवानांचे नाव असून या तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामसू-रामबन भागात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. महामार्गाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी परत सुरू करण्यात आला आहे. तरीही, ४० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रामबन-रामसू पट्टा अजूनही धोकादायक आहे. हा जवळपास ३०० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा एक कमजोर भाग आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील एसके पायीन भागात सहा जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता आणि दोन गंभीर जखमी झाले होते. (Jammu Kashmir Accident)
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…