Earthquake : जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के

Share

नवी दिल्ली : जम्‍मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुजरातमध्ये काल (दि २) रात्री ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला. तर जम्‍मू काश्मीरमध्ये रात्री झालेल्‍या भूकंपाची तीव्रता २.७ इतकी नोंदवली गेली. लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता ३.९ इतकी नोंदवली गेली. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (जीएसडीएमए) नुसार, गुजरात भूकंपाच्या बाबतीत उच्च जोखीम असलेले क्षेत्र आहे. गेल्या २०० वर्षांत येथे ९ मोठे भूकंप झाले आहेत.

https://prahaar.in/2025/05/03/work-on-the-stalled-escalator-at-dombivli-railway-station-begins/

जीएसडीएमएच्या मते, २६ जानेवारी २००१ रोजी कच्छमध्ये झालेला भूकंप गेल्या २ शतकांमध्ये भारतात आलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता. अंदाजे १३ हजार ८०० लोक मृत्युमुखी पडले आणि १ लाख ६७ हजार लोक जखमी झाले. पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे भूकंप होतात. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत होणाऱ्या ताणतणाव आणि क्रियाकलापांमुळे हे प्रामुख्याने आपत्ती म्हणून घडतात. भारतात भूकंप येण्याचे मुख्य कारण म्हणजे हिमालयीन प्रदेशातील टेक्टोनिक क्रियाकल्‍प. येथील तणाव भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील होणाऱ्या धडकेमुळे आहे. यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि भूकंप होतात.

Recent Posts

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

7 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

20 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago