अलिबाग : शनिवारच्या दुपारी ४ वाजल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला आणि गेटवे-मांडवा जलमार्गावरील अजंठा कंपनीच्या बोटींची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली. यामुळे अलिबागकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
उन्हाळी सुट्टी, शनिवार-रविवारचा दिवस, त्यात बोटी बंद असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करत ताटकळत बसण्याची वेळ आली.
https://prahaar.in/2025/05/03/next-4-days-are-important-warning-of-unseasonal-rains-with-gusty-winds/
मात्र मालदार व पीएनपी या कंपन्यांच्या बोटी दर दोन तासांनी सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे या बोटींवर प्रवाशांची विशेष गर्दी झाल्याचं दिसून आलं.
गर्दीचा अंदाज घेता, पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, हवामानाच्या चटकन बदलणाऱ्या स्थितीमुळे प्रवाशांना अचानक फटका बसण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी हवामान व जलवाहतूक अपडेटची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…