नवी दिल्ली: एका बाजूला मे चा कडक उन्हाळा सुरु झाला असताना, दिल्लीत अचानक आलेल्या पाऊसाने कहर केला आहे. (Delhi Weather Thunderstorm) ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे
शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्तीचे रूप धारण केले. दिल्लीतील द्वारका येथे पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख २६ वर्षीय ज्योती आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तर ज्योतीचा पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.
आज जोरदार वाऱ्यामुळे दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक भागात झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याचे वृत्त आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचा आणि आवश्यक नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
राजधानीतील बदलत्या हवामानामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक प्रभावित झाली. विमानतळ चालवणारी कंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) ने सांगितले की, खराब हवामानामुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला. प्रतिकूल हवामानामुळे उत्तर भारतातील काही भागात विमान वाहतूक प्रभावित झाल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…