कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून केली हत्या

Share

मंगळुरू : कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यापासून दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरूत तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीचा अंदाज येताच कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळुरूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सुहास शेट्टीची हत्या झाल्यानंतर उल्लालमधील फैझल, कोंचाडीमधील मोहम्मद लुकमान आणि कन्नूरच्या इरशादवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मंगळुरूचे पोलीस तपास करत आहेत.

सुहास शेट्टी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुरुवारी रात्री उडुपी तालुक्यातील अथराडी येथे एका मुसलमान तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी चालक अबू बक्करच्या ऑटोरिक्षाचा रस्ता अडवला. नंतर हल्लेखोरांनी तलवारी आणि बाटल्यांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अबू बक्कर पळून गेला आणि हिरियाडका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिरियाडका पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. आरोपी सुशांत आणि संदेश पुजारी यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एनआयएकडे सोपवावे अशी मागणी होत आहे.

सुहास शेट्टीच्या हत्येनंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. यामुळे मंगळुरूत तणाव आहे. पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

Recent Posts

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

3 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

51 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

1 hour ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago