Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाणेकरांनो, आजच पुरेसे पाणी भरून ठेवा!

ठाणेकरांनो, आजच पुरेसे पाणी भरून ठेवा!

ठाणे शहरात काही भागात उद्या-परवा पाणीपुरवठा बंद

ठाणे (प्रतिनिधी): ठाणे महापालिकेला प्राधिकरणाकडून स्टेम होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी रात्री. ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

परिणामी, शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९ ते रा. ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी रा. ९ पासून शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी स. ९ वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहील.

शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -