पहलगाममध्ये आठवडाभर राहिल्यानंतर अतिरेक्यांनी केला हल्ला

Share

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवार २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारुन २५ पर्यटक आणि एक स्थानिक अशा एकूण २६ जणांची हत्या केली. अतिरेक्यांनी नागरिकांवर गोळीबार केला. या प्रकरणात एनआयए तपास करत आहे. आतापर्यतच्या तपासातून धक्कादायक माहिती हाती आल्याचे सूत्रांकडून समजते.

https://prahaar.in/2025/05/01/pakistan-violates-ceasefire-for-seventh-consecutive-night-india-gives-befitting-reply/

हल्ला मंगळवार २२ एप्रिल रोजी झाला असला तरी अतिरेकी पहलगाममध्ये १५ एप्रिल पासून मुक्कामाला होते. स्थानिक पातळीवर निवडक नागरिकांनी अतिरेक्यांना मदत केली. या मदतीमुळेच अतिरेकी सुरक्षितरित्या लपून राहू शकले. प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवशी शस्त्र हाती घेऊन अतिरेकी नागरिकांची हत्या करू शकले होते; असे तपासातून एनआयला कळले असल्याचे सूत्रांकडून समजते.

https://prahaar.in/2025/05/01/from-atms-to-railway-tickets-these-new-changes-are-being-implemented-in-the-country-from-today/

घनदाट जंगल, डोंगराळ परिसर, गुहा या नैसर्गिक रचनेचाही अतिरेक्यांनी त्यांच्या कारवाईसाठी वापर करुन घेण्याचे नियोजन केले होते. हा हल्ला लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फोर्सच्या अतिरेक्यांनी केला. पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेला एक अतिरेकी हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी कमांडो होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यानंतर अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात हाशिम मुसा नावाच्या अतिरेक्याचे चित्र आहे. तोच हा अतिरेकी आहे. हाशिम मुसा हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) कमांडो होता.

मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो होता. लष्करी सेवेतून बाहेर पडल्यानंतर मुसा लष्कर – ए – तोयबा या अतिरेकी संघटनेसाठी काम करू लागला. कलम ३७० हटवल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक प्रगती सुरू आहे. या प्रगतीत अडथळा निर्माण करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला ब्रेक लावण्यासाठी अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांनाच लक्ष्य केले.

पर्यटकांना ठार करण्याआधी अतिरेक्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळेच अतिरेक्यांनी सहजतेने गोळीबार करुन पर्यटकांना लक्ष्य केले. अतिरेकी हल्ल्यासाठी पाकिस्ताननेच आर्थिक मदत दिली होती. या व्यतिरिक्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या १५ जणांनी अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर हवी ती मदत पुरवल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आता एनआय करत आहे.

एनआयएच्या हाती पाकिस्तानी अतिरेक्यांचे कोडवर्ड बुक आले आहे. अतिरेक्यांनी पहलगाममध्ये येण्यापासून ते हल्ला करुन घटनास्थळावरुन पळून जाईपर्यंत वापरलेले कोडवर्ड आणि त्यांचे अर्थ समजून घेणे या पुस्तकामुळे एनआयएला सोपे झाले आहे. सध्या तपास पथक कोडवर्डच्या मदतीने अतिरेकी त्यांच्या म्होरक्यांना कोणकोणती माहिती देत होते हे जाणून घेत आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

47 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

49 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago