नवी दिल्ली : २०२५ च्या मे महिन्यात भारताला प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागांत सामान्यपेक्षा १ ते ४ दिवस अधिक उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये आधीच ७२ उष्णतेच्या लाटांचे दिवस नोंदवले गेले असून, मे महिन्यात ही संख्या आणखी वाढू शकते. गुजरात व राजस्थानमध्ये ६ ते ११ दिवस, तर विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड येथे ४ ते ६ दिवस ही लाट राहू शकते. महाराष्ट्रात तुलनेने कमी परिणाम होईल, परंतु उष्णतेपासून पूर्ण सूट मिळणार नाही.
तरीही एक दिलासादायक बाब म्हणजे, मे महिन्यात वारंवार येणाऱ्या वादळांमुळे तापमान काहीसं नियंत्रणात राहू शकते. मे २०२४ मध्ये जसे अती तापमान पाहायला मिळाले, तशी स्थिती यंदा टळण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात पावसाची पातळी सामान्य ते जास्त राहील. मात्र वायव्य, मध्य आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहू शकते.
उत्तर भारतात मात्र, १०९ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…