उष्णतेचा कहर होणार! तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा!

Share

मुंबई : देशातल्या विविध भागात उष्णतेचा कहर होणार असून तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच १ मे ते २ जून २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या काळात सूर्यप्रकाशात फिरल्याने गुदमरल्यासारखे वाटणे, घाम न येणे, उलट्या, चक्कर येणे, उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.


घरी घ्या ही खबरदारी:

  • खोलीचा दरवाजा आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा – हवा खेळती राहील.

  • मोबाईल फोन अत्यंत गरजेपुरता वापरा – उष्णतेने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता!

  • शक्य असल्यास दर दोन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या.

  • घरातील AC २४-२५°C वर ठेवा – जास्त थंडपणा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.


शरीर थंड ठेवण्यासाठी हे प्या:

  • दही, ताक, उसाचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी

  • थंड पाणी – दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या

  • गरम व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळा


गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा:

  • सकाळी गाडीने प्रवास टाळा

  • गाडीतील गॅस सिलिंडर, लाइटर, परफ्यूम, कोल्ड्रिंक्स, बॅटर्‍या काढून टाका

  • कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा (व्हेंटिलेशनसाठी)

  • कारचे टायर जास्त फुगवू नका – उष्णतेने फुटण्याचा धोका

  • इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा


सर्पदंश आणि विंचवांपासून सावधगिरी:

  • साप, विंचू उष्णतेमुळे थंड जागांचा शोध घेतात

  • बागेत, अंगणात आणि घरात तपासणी करा

  • शक्य असल्यास रात्री उघड्या पायाने फिरणे टाळा


वीज आणि इंधन सुरक्षेबाबत खबरदारी:

  • गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका

  • AC फक्त गरज असेल तेव्हाच वापरा

  • घरातील वीज मीटर आणि वायरिंग ओव्हरलोड होणार नाही याची खात्री करा

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

40 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

43 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago