Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीउष्णतेचा कहर होणार! तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा!

उष्णतेचा कहर होणार! तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा!

मुंबई : देशातल्या विविध भागात उष्णतेचा कहर होणार असून तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच १ मे ते २ जून २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या काळात सूर्यप्रकाशात फिरल्याने गुदमरल्यासारखे वाटणे, घाम न येणे, उलट्या, चक्कर येणे, उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.


घरी घ्या ही खबरदारी:

  • खोलीचा दरवाजा आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा – हवा खेळती राहील.

  • मोबाईल फोन अत्यंत गरजेपुरता वापरा – उष्णतेने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता!

  • शक्य असल्यास दर दोन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या.

  • घरातील AC २४-२५°C वर ठेवा – जास्त थंडपणा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.


शरीर थंड ठेवण्यासाठी हे प्या:

  • दही, ताक, उसाचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी

  • थंड पाणी – दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या

  • गरम व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळा


गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा:

  • सकाळी गाडीने प्रवास टाळा

  • गाडीतील गॅस सिलिंडर, लाइटर, परफ्यूम, कोल्ड्रिंक्स, बॅटर्‍या काढून टाका

  • कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा (व्हेंटिलेशनसाठी)

  • कारचे टायर जास्त फुगवू नका – उष्णतेने फुटण्याचा धोका

  • इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा


सर्पदंश आणि विंचवांपासून सावधगिरी:

  • साप, विंचू उष्णतेमुळे थंड जागांचा शोध घेतात

  • बागेत, अंगणात आणि घरात तपासणी करा

  • शक्य असल्यास रात्री उघड्या पायाने फिरणे टाळा


वीज आणि इंधन सुरक्षेबाबत खबरदारी:

  • गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका

  • AC फक्त गरज असेल तेव्हाच वापरा

  • घरातील वीज मीटर आणि वायरिंग ओव्हरलोड होणार नाही याची खात्री करा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -